...

'रस्त्यावरून आणले मला, आई सोडून गेलेली' इतकीच आठवण सांगणारी अंजली.
'असे.. असं हात बांधून मारले मला, थोटे बाईनी'हे सुद्धा खिदळत सांगणारी आक्का.
४५ मुलींचे हे घर. सगळ्या बहूतेक अश्या रस्त्यावर सोडून दिलेल्या. दोष काय? तर मतिमंदत्व..कुणाला रस्त्यावरून आणलं, कुणाला येरवड्याहून
treatment घेऊन, कुणाला आर्थिकदृष्ट्या मोडकळीला आलेल्या आश्रामातून..
'आई बाप नाहीये' याबरोबरच सुरु होणारा आमचा दिवस. 'तू आहे मला, माझी आहे' अशी आपली होणारी वाटणी.
कसलीच नीटशी जाणीव नसलेलं त्यांचं आयुष्य, अगदी पोटात किती अन्न ढकलायाच याचीही कल्पना पुरेशी नाही.पण माणूस योनीत जन्माला आलो आहोत याची जाणीव करून देण्यासाठी भोगायला लागणारे 'स्त्री-धर्माचे' त्रास!
प्रेमाचा, मायेचा असा.. काहीच अनुभव नाही.

'आई बात मेले ना तेवा एक मानुस लस्त्यावर सोलून देला..मला नादले कलुन बलात्काल केला मद मालले' १२ वर्षाच्या पायलचे हे उद्गार ऐकून क्षण थांबले.
मतिमंद मुलींवर होणारे बलात्कार किंवा अन्य अत्याचार क्रुरपणाचा कळस आहे. अश्या मुलांवर सर्रास अत्याचार होतात. ज्या संस्थांमध्ये ते असतात तिथेही कुणासाठी punch bag होतात तर कुणासाठी sex toy.

अधिक बोलणे न लगे.. खूप जड मेंदूने लिहिलंय.. इतकंच कि जर एखादे मतिमंद मुल, विशेषतः मुलगी, असे कुठे नजरेच्या टप्प्यात दिसले तर पटकन पावले वळवू नका. दुर्लक्ष नको. योग्य ठिकाणी पोहचवले तर खूप अनर्थ टाळता येईल.

0 comments: