माणसांनी येऊ नये जवळ
डोळे मिटून,
आकडेमोड करत, किंवा शंकेत झुरत.
वल्नरेबिलीटी हा काही चॉईस नाहीये
माणसांनी यावं जवळ,
आपण पाहिलेले सगळे सूर्यास्त घेऊन
अनवाईंड करावे शरीरातले सगळे तंतू
आणि दुस-या माणसांच्या तंतुंशी करून टाकावे सोल्डर
आर्बीट्ररी
विस्कटलेल्या अंथरुणाची
करावी लागू नये सारवासारव,
इतकं खरं - यावं जवळ
माणसांनी
No comments:
Post a Comment